शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

बालगृहातील ५४ विद्यार्थ्यांनी मिळविले दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 21:44 IST

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्'तील बालगृह संस्थां मध्ये चालू वर्षी ५७ मुला-मुलींनी दहावीची बोर्ड परीक्षा दिली होती. यापैकी ५४ मुला-मुलींनी घवघवीतपणे यश संपादन केले आहे. कोल्हापूर जिल्'तील या बालगृहांतील मुलांमध्ये सर्वाेच्च गुण ९१ टक्के आहेत.वाय.डी. माने बालगृहाम धील एका विद्यार्थ्यांने ९१ टक्के, देवचंद शहा बालगृहामधील एका विद्यार्थ्यांने ८५ टक्के, मुलांचे निरीक्षणगृह, ...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्'तील बालगृह संस्थांमध्ये चालू वर्षी ५७ मुला-मुलींनी दहावीची बोर्ड परीक्षा दिली होती. यापैकी ५४ मुला-मुलींनी घवघवीतपणे यश संपादन केले आहे. कोल्हापूर जिल्'तील या बालगृहांतील मुलांमध्ये सर्वाेच्च गुण ९१ टक्के आहेत.

वाय.डी. माने बालगृहामधील एका विद्यार्थ्यांने ९१ टक्के, देवचंद शहा बालगृहामधील एका विद्यार्थ्यांने ८५ टक्के, मुलांचे निरीक्षणगृह, कागल आणि मुलींचे निरीक्षणगृह, कोल्हापूर येथील एकेक विद्यार्थ्यांना ८0 टक्के गुण मिळाले आहेत. इतर मुला-मुलींनीही चांगले गुण मिळवून यश संपादन केले आहे. काळजी आणि संरक्षणाची गरज असणाऱ्या या मुला-मुलींना बालगृहांमध्ये बालकल्याण समितीमार्फत प्रवेश दिला जातो. त्यामुळे बिकट परिस्थितीतून आल्यानंतर संस्थेत राहून असे यश संपादन करणे हे निश्चितच कौतुकास्पद आहे.

समस्याग्रस्त कौटुंबिक वातावरणातून बालगृहांत दाखल झालेल्या या मुला-मुलींच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.देवचंद शहा बालगृहातील १३ पैकी १२, वाय.डी. माने बालगृहातील १२ पैकी १२, कागल येथील निरीक्षणगृहातील ८ पैकी ७, अनिकेत निकेतनमधील ४ पैकी ३, कोल्हापुरातील मुलींच्या निरीक्षणगृहातील २ पैकी २, मुलांच्या निरीक्षणगृहातील ६ पैकी ६, मुलींच्या बालगृहातील १0 पैकी १0 तसेच अवनि बालगृहातील २ पैकी २ विद्यार्थी या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. आभास फाउंडेशनचे अध्यक्ष अतुल देसाई यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

बालकल्याण संकुल संचलित डॉ. सर्वपल्ली निरीक्षणगृह, कन्या बालगृह, कन्या निरीक्षणगृह आणि अनिकेत निकेतन बालगृहातील एकूण २२ विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती. या बालगृहातील हरीश गजानन पाटील (८१ टक्के), ऋतुजा संजय चव्हाण (८0), कोमल राजाराम शिंदे (७५), विद्या संजय लव्हटे (७२), अश्विनी दत्ता साळे (६८), आरती संजय शिंदे (६७), सुप्रिया सुभाष नाईक (६६), सुफियान मेहबूब शेख (६५), सुमित सर्जेराव इंगळे (६४), यश सचिन राणे (६४), दिव्या यशवंत कांबळे (५७), पूनम राजू सावंत (५५), शुभम परशुराम खोत (५५), भाग्यश्री सुरेश सुतार (५४) या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. या विद्यार्थ्यांना शाळेतील पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाºयांचे तसेच संबंधित शाळेतील शिक्षकांचेही सहकार्य लाभल्याची माहिती बालगृहाच्या मानद कार्यवाह पद्मजा तिवले यांनी दिली आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरexamपरीक्षा